नेवासा तालुक्यात शेतकरी संघटना आक्रमक भूमिकेत; सरकारच्या उलट्या काळजाचा निषेध!


नेवासा तालुक्यात शेतकरी संघटना आक्रमक भूमिकेत; सरकारच्या उलट्या काळजाचा निषेध!

नेवासा (प्रतिनिधी):
राज्यभरातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी मुंबईत उपोषण सुरू केले आहे. मात्र, हे उपोषण सुरु असतानादेखील सरकारचे मन द्रवले नाही हे अत्यंत लाजिरवाणे आहे. या निर्दयी, उलट्या काळजाच्या सरकारचा निषेध करत आता नेवासा तालुक्यातील शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना आक्रमक पवित्र्यात उतरली आहे.
नेवासा तालुक्यातील वंचित, दुर्लक्षित शेतकऱ्यांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी कोणत्याही प्रसिद्धीचा हव्यास न बाळगता अथक प्रयत्न करणारे शेतकरी नेते त्रिंबक पाटील भदगले हे नाव शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचं प्रतीक बनलं आहे. शासनाच्या पिक विमा योजना असो वा खासगी विमा कंपन्यांच्या उशीर झालेल्या भरपाईसंदर्भातील अडचणी — भदगले आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी दबावतंत्र वापरून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत संघर्ष केला.
आज बच्चू कडू उपोषणावर आहेत आणि तरीही राज्य सरकार शांत आहे. ही शांतता म्हणजे शेतकऱ्यांच्या वेदनेचा अपमान आहे. या पार्श्वभूमीवर शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने बच्चू कडू यांच्या कर्जमुक्ती आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. आता नेवासा तालुक्यातील संपूर्ण शेतकरी वर्ग संघटीत होऊन सरकारला जागं करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे
जर सरकारने तात्काळ कर्जमुक्तीचा निर्णय घेतला नाही, तर नेवासा तालुक्यातील शेतकरी संघटना अधिक तीव्र आंदोलन करणार आहे. हे सरकार जर अजूनही झोपेत असेल, तर ती झोप आता मोडल्याशिवाय राहणार नाही. उलट्या काळजाच्या सरकारच्या विरोधात लढा देण्यासाठी शेतकरी संघटना सज्ज झाली आहे!


---


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.