नेवासा प्रतिनिधी: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सोमवारी, १६ जून २०२५ रोजी मुकिंदपूर येथील हनुमान मंदिर, इरिगेशन कॉलनी येथे 'हिंदूसाम्राज्य दिन उत्सव' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या पवित्र दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देणारा हा सोहळा संघाच्या स्वयंसेवकांनी एकत्र येऊन साजरा केला. तसेच संघ चालक आगळे यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करून प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून तसेच भगव्या ध्वजाला पुष्पहार घालून समस्त उपस्थित संघााच्या स्वयं सेवकांनी मानवंदना देऊन अभिमान व्यक्त केला
कार्यक्रमाच्या प्रारंभात प्रमुख पाहुणे श्री. भरतकुमार नरहरी उदावंत (समाज प्रबोधक, चित्रकार व लोक कलावंत) यांनी आपल्या व्याख्यानात व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवर प्रकाश टाकला. त्यांनी 'बोलत्या भिंती' या संकल्पनेवर आधारित चित्रांचे सादरीकरण करून उपस्थितांना विचार करण्यास प्रवृत्त केले. तसेच त्यांनी दिलेेल्य शेवटच्या छत्रपती शिवाजी महारााज की जय घोषणांनी परिस्तर बनवन गेला
प्रमुख वक्ते श्री. विजयकुमार ढोले (सह-बौद्धिक प्रमुख, उ. नगर जिल्हा) यांनी 'शिवराज्याभिषेक' या ऐतिहासिक घटनेवर सखोल भाष्य केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट करत, स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या त्यागाची महती सांगितली.
राजगिरे सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोष करणारे गीत गायन केले. सर्व उपस्थितांनी एकत्र येऊन त्या गीताचे पठण केले, ज्यामुळे वातावरण भारले.
संघनायक यांचे नियुक्तीचे औपचारिकतेनंतर, संघचालक श्री. स्वप्निल पोतदार यांनी 'वैयक्तिक राष्ट्रभक्ती' या विषयावर एक प्रेरणादायी कविता सादर केली. त्यांच्या कवितेत राष्ट्रप्रेम आणि त्यागाची गोडी उपस्थितांपर्यंत पोहोचली.
हा उत्सव संघाच्या नियमांनुसार अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी ठरला. उपस्थित सर्वांनी एकजुटीने हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी केलेल्या त्यागाची आठवण ठेवून, राष्ट्रभक्तीच्या शपथ घेतली.