जागतिक किसान सेल महाराष्ट्र अध्यक्षपदी जगन्नाथ कोरडे आणि जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र थेटे यांची निवड
मुंबई, 3 मार्च 2025 – महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीतील आघाडीचे नेते श्री. जगन्नाथ महादेव कोरडे यांची जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या किसान सेल महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी आणि श्री. राजेंद्र गंगाधर थेटे यांची अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्तात्रय विठ्ठल तळवले यांनी ही निवड जाहीर केली.
श्री. कोरडे आणि श्री. थेटे यांची ही निवड त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक कार्य, शेतकरी हक्कांसाठीचा लढा आणि निःस्वार्थ सेवाभाव लक्षात घेऊन करण्यात आली आहे.
श्री. कोरडे हे शेतकऱ्यांच्या समस्यांवर आवाज उठवण्यासाठी नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन लढा देणारे नेता म्हणून ओळखले जातात. त्यांचा आवाज शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी कायम बुलंद राहिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक जोमाने सोडवले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
श्री. थेटे हे देखील सामाजिक कार्यात सक्रिय असून, त्यांनी अनेक आंदोलने आणि लोकहिताच्या कार्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.
निवडीबद्दल बोलताना श्री. कोरडे म्हणाले, "शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणे आणि त्यांच्या न्यायहक्कांसाठी झुंज देणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट आहे. या जबाबदारीतून महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्नशील राहीन."
श्री. थेटे यांनी देखील आपल्या भूमिकेबद्दल आश्वासन देत सांगितले की, "अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी संघर्षाची तयारी ठेवीन आणि त्यांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर राहीन."
राज्यभरातील विविध भागांतून श्री. कोरडे आणि श्री. थेटे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, अनेक शेतकरी संघटनांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या आक्रमक आणि संघर्षशील भूमिकेमुळे आता शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील, अशी अपेक्षा राज्यभरातील शेतकरी संघटनांनी व्यक्त केली आहे.