अहमदनगर यंदा खरीप हंगामातील सप्टेंबर-ऑक्टोबर
महिन्यात सततचा पाऊस वअतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले. या नुकसानीची शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी
यासाठी तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन याबाबत
आग्रह धरला आहे. मात्र, अद्यापशेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळाली नाही. हे एकीकडे वास्तव असताना दुसरीकडे विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची नगण्य
रक्कम देऊन बोळवण केली जातआहे. विमा कंपन्यांची नफेखोरीसुरू असल्याचा घणाघातीआरोप आमदार रोहित पवार यांनी केला.