1000 अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या, एसटीतील या सुनामीचे कारण काय

ISTएसटी महामंडळात 1000 अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या होणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे आदेश दिले असून, तीन वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली केली जाणार आहे. : एसटी महामंडळात आता अधिकाऱ्यांच्या बदल्यांची सुनामी येणार आहे. एकाच वेळी 50-100 थेट जवळपास एक हजार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहे. एसटी महामंडळात मागील 3 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या तातडीने बदली करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाला दिले. त्यामुळे किमान 1000 अधिकाऱ्यांवर बदलीची टांगती तलवार आहे.सोमवारी, आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.या बैठकीनंतर, आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले की, नेक अधिकारी एकाच मुख्यालयात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसल्यामुळे त्यांचे काही ठराविक कर्मचाऱ्यांशी हितसंबंध निर्माण होतात. त्यातून ते इतर कर्मचाऱ्यांवर अन्याय करतात. याचा विपरीत परिणाम एस टी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर होत असल्याचा दावा त्यांनी केला. भविष्यात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी बैठकीत केली होती असेही प्रताप सरनाईक यांनी म्हटले.advertisementया बैठकीत कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यासंदर्भातही सविस्तर चर्चा झाली. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, असेही परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.