शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊन आत्महत्या करू नये, शेतकरी संघटना आपल्या पाठिशी उभा, फक्त लढावे लागेल – अजित काळे
शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय अजित काळे साहेब यांनी दूध प्रश्नावर शासनाला जागं करताना काही महत्वाच्या मुद्द्यांवर परखड मत व्यक्त केले. त्यांनी दूध उद्योगात होणारी शेतकऱ्यांची लूट आणि त्यासाठी कायद्याची दुरुस्ती करण्याची आवश्यकता व्यक्त केली.
काळे साहेब म्हणाले की, शेतकऱ्यांचा शोषण रोखण्यासाठी भेसळीचे प्रमाण कमी करण्यासाठी कडक कायदा लागू करावा लागेल. डब्ल्यूएचओ (WHO) यांच्या मते, भारताला दरवर्षी किती दूध आवश्यक आहे आणि प्रत्यक्षात किती दूध उत्पादन होत आहे यावर सखोल माहिती दिली.
त्यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने योग्य पाऊले उचलावीत, असे सांगितले. "शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची परिस्थिती येऊ नये, त्यासाठी योग्य दूध दर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर लढा उभा करावा लागेल. शेतकरी संघटना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे," असे त्यांचे ठाम मत होते.
अजित काळे यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी शेतकऱ्यांना एकजुट होण्याचे आवाहन केले.